विराटियन की अँग्री यंग मॅन? विराट कोहली, श्रेयस अय्यरची प्रतिष्ठा पणास; उत्सुकता शिगेस

विराट कोहली, श्रेयस अय्यरची प्रतिष्ठा पणास; उत्सुकता शिगेस...


अहमदाबाद : १८ वर्षे एखाद्या जेतेपदाची प्रतीक्षा करणे किती कष्टप्रद असते, याचा 'याचि देही, याचि डोळा' अनुभव घेणारे 'आरसीबी' व पंजाबचे संघ आज 'आयपीएल' निर्णायक जेतेपदासाठी आमने-सामने भिडतील, त्यावेळी अवघ्या क्रिकेट वर्तुळासाठी ती अनोखी पर्वणी ठरणार आहे. एकीकडे, विराट कोहलीचा करिष्मा तर दुसरीकडे, श्रेयस अय्यर फॅक्टरमध्ये या निमित्ताने जोरदार रस्सीखेच रंगणे अपेक्षित आहे. एका अर्थाने 'अँग्री यंग मॅन विरुद्ध विराटियन', असेच या लढतीचे स्वरूप असेल. उभय संघातील ही लढत सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी खेळवली जाईल. विराट कोहली या स्पर्धेच्या प्रारंभापासूनच 'आरसीबी' संघाशी एकनिष्ठ राहत आला असून, मंगळवारी त्याला येथे आपल्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये 'आयपीएल' जेतेपद समाविष्ट करण्याची नामी संधी असेल. 

मुंबईला चारीमुंड्या चीत करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा श्रेयस अय्यर मात्र 'आरसीबी'च्या मार्गातील मुख्य अडथळा ठरू शकतो. 'आरसीबी' ने आजवर तीनवेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, या तिन्ही वेळा त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. ती कसर एका मॅचविनिंग खेळीने भरून काढण्याचा विराट कोहलीचा अर्थातच निर्धार असणार आहे

दुसरीकडे, श्रेयस अय्यरदेखील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आणल्यानंतर तशीच आणखी एक धडाकेबाज खेळी 'आरसीबी' विरुद्ध साकारत पंजाबला अविस्मरणीय विजय संपादन करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. श्रेयससाठी 'आयपीएल'ची फायनल नवी नाही. त्याने २०२० च्या 'आयपीएल' फायनलमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते, तर गतवर्षी 'केकेआर' संघाचा कर्णधार या नात्याने त्यानेच झळाळता 'आयपीएल' चषक उंचावला होता. यंदा त्याचीच पुनरावृत्ती पंजाबकडून करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

'आरसीबी'चा संघ कर्णधार रजत पाटीदार व मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवे पराक्रम गाजवत आला असून, त्यांच्याकडे जवळपास प्रत्येक क्रमांकावर मॅचविनर्स आहेत. गतवर्षी या संघातील काही मुख्य खेळाडूंवरच अतिरिक्त भार होता. यंदा मात्र त्यांचे अनेक दाहाल, मंगळवारी त्याला येथे आपल्य खेळाडू चमक दाखवत आले आहेत. जलद गोलंदाज जोश हेझलवूड परतल्याने 'आरसीबी'ची गोलंदाजी मजबूत झाली असून, फिल सॉल्टचा परिस स्पर्शही निर्णायक ठरू शकतो. पंजाबचा गोलंदाजीतील बेस्ट बेट युजवेंद्र चहलला किती सूर सापडणार, यावरदेखील बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. यापूर्वी पंजावने मुंबईला चीतपट केले, त्यावेळी श्रेयस अय्यरला तितकीच तोलामोलाची साथ देणाऱ्या नेहल वधेराची कामगिरीदेखील येथे लक्षवेधी ठरू शकते.

काय सांगतो दोन्ही संघांचा पूर्वेतिहास ?

'आरसीबी'ने यापूर्वी २००९, २०११ व २०१६ अशा तीन हंगामांत फायनल गाठली. मात्र, डेक्कन चार्जस, चेन्नई सुपर किंग्ज व सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध त्यांना अनुक्रमे पराभव पत्करावे लागले आणि उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पंजाबने २०१४ मध्ये अंतिम फेरीत धडक मारली; पण त्यावेळी त्यांना 'केकेआर'ने पराभवाची धूळ चारली होती.

ई सला कप नमदे'चे काय होणार?

भारत-पाकिस्तान या कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात सामना होणार असताना ज्याप्रमाणे मौका मौकाच्या जाहिराती टीव्हीवर झळकतात; पण अंतिमतः पाकिस्तानच्या पदरी निराशाच येते, तीच गत 'आयपीएल' स्पर्धेत 'आरसीबी'ची होते, असे आजवरच्या वाटचालीत दिसून येते. दरवर्षी हा संघ 'ई सला कप नमदे', अर्थात यंदा कप आमचाच हा नारा घेऊन येतो; पण दरवर्षी कुठे ना कुठे त्यांची गाडी अडखळते आणि रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागते. यंदा हा संघ पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उत्साहात शड्डू ठोकून फायनलमध्ये पोहोचला असून, साहजिकच या वर्षी तरी त्यांची जेतेपदाची कसर कन निघणार का? याकडे तमाम क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिलेले असणार आहे.

रजत, अय्यर, विराटला खुणावतोय नवा विक्रम !

आजच्या 'आयपीएल' फायनलच्या निमित्ताने विराट कोहली, श्रेयस अय्यर व रजत पाटीदार यांना नवा विक्रम खुणावत असणार आहे. रजत पाटीदारकडे येथे शेन वॉर्न, रोहित शर्मा व हार्दिक पंड्या यांच्यानंतर आपल्या नेतृत्वाच्या पहिल्याच हंगामात विजेतपद खेचून आणणारा चौथा कर्णधार बनण्याची संधी असेल. याशिवाय, श्रेयस अय्यरकडे दोन विभिन्न संघांकडून दोन 'आयपीएल' जेतेपदे जिंकण्याची नामी संधी असणार आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे विराट कोहलीने येथे 'आयपीएल' जिंकण्यात यश मिळवले, तर त्याच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये वन-डे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप व २ चॅम्पियन्स ट्रॉफींसह 'आयपीएल' ट्रॉफीचाही समावेश होऊ शकणार आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.