राज्यात शेतकऱ्याच झालेल्या ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

उन्हाळी पिकांना मुसळधार पावसाचा फटका; बळीराजा चिंतेत

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढून ४० हजार ९४९ हेक्टरवर पोहचला आहे. त्यामध्ये उन्हाळी हंगामातील बहुतांश पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अमरावती, बुलडाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वाधिक तडाखा बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लावली असून, कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.

राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बहुतांश जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीस सुरुवात झाली. जवळपास गेले २० दिवस पावसाने ३४ तालुक्यांत हजेरी

खरीप पेरण्याही लांबण्याची शक्यता

उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंब्याचे नुकसान झाले आहे. तसेच, अन्य फळबागांना हानी पोहचली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी तयार केलेल्या भात रोपवाटिकाही वाया गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे जमिनीला वाफसा लवकर येण्याची चिन्हे कमी असल्याने खरीप हंगामातील पेरण्याही लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पावसाने प्रमुख जिल्ह्यांत झालेले पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) :

अमरावती १२,५६५, अकोला ९०९, चंद्रपूर १,५७२, बुलडाणा ६,६९९, जळगाव ४,५३८, पालघर ७९६, लातूर ९५७, जालना १,७२६, छत्रपती संभाजीनगर ४५६, सोलापूर १, ६८२, अहिल्यानगर १,४४१, नाशिक ३,५२३, पुणे ६७६, कोल्हापूर ९५, सांगली ६, सातारा ७३.

पंचनाम्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत : मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यभर शेती आणि रस्त्यांचे नुकसान झाले असून, पंचनाम्याचे आकडे येताच 'एनडीआरएफ'च्या निकषाप्रमाणे नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. राज्यात अनपेक्षितपणे वेळेआधीच मान्सून धडकला आहे. राज्यभर सर्वत्र मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी ढगफुटी झाल्याने विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात शेती आणि शेतपिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. तसेच, नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण होताचएनडीआरएफ' च्या निकषाप्रमाणे नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल,पावसामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सावध राहून नागरिकांना सूचना आणि मदत करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या काळात सर्वसंबंधित यंत्रणांना आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.


No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.